Posts

तळोदा बाजार समितीतर्फे ग्राहकांना घरपोच गहू व दादर पुरविण्याची सुविधा..

Image
दि. 16- तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल उत्पादक ते ग्राहक पुरविण्याच्या योजनेअंतर्गत गहू व दादर बाजार भावापेक्षा कमी दराने देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशोक  चाळक यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सुरू आहे. बाजार समितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुचनांचे पालन करण्यात येत आहेत. येथे हात धुण्यासाठी साबण व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सामाजिक संस्थांच्या मदतीने भोजन व्यवस्थादेखील करण्यात येत आहे. ग्राहकांना चांगला शेतमाल कमी दरात मिळावा यासाठी समितीने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांनी बाजारात गर्दी करू नये यासाठी त्यांना गहू व दादर घरपोच देण्यात येणार आहे. शेतमाल स्वच्छता व प्रतवारीकरण करून प्रत्येकी 25 किलोची बॅग याप्रमाणे देण्यात येईल. सदरचा शेतमाल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दाराशी पोहोच केला जाईल. दादरचा दर 4400 रु व गहूचा दर 2400 रुपये प्रति क्विंटल आहे. इच्छुक ग्राहकांनी  बाजार समिती निरीक्षक संजय कलाल (7066813910/915...

तलोद्यात पारा वाढल्याने रस्ते निर्मनुष्य

Image
सुनील सुर्यवंशी तळोदा संपूर्ण देश  लॉक डाऊन असताना तळोदा शहर देखील त्याला अपवाद नाही मात्र लॉकडाऊन दरम्यान  सकाळी मोठ्या प्रमाणात  नागरिक बाजारहाट  करण्यासाठी येतात , तर मात्र काही तरुण कारण नसतांना रस्त्यावर फिरताना दिसत आहेत तळोदा पोलिसांनी मागील आठ दिवसापासून  दुचाकीवर  कार्यवाही सुरू केली असून दररोज कार्यवाही होत असली तरी दुचाकी स्वार दिसतच आहेत , मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून निसर्गाने आपली संचारबंदी  सुरू केली असून दुपारी बारा वाजे नंतर तप्त उन्हाच्या झळा सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत जात असल्याने सर्वच रस्ते निर्मनुष्य होताना दिसतात शहरात भाजीबाजारात सकाळी बऱ्यापैकी वर्दळ दिसते मात्र बारा वाजे नंतर सर्वत्र सामसूम दिसून येत असून प्रशासनाने संपूर्ण दिवस  लॉक डाऊन केला असला तरी  नागरिक रस्त्यावर येत होते आता मात्र दुपारी  सूर्य आग ओकताना  दिसत आहे त्यामुळं शहादा रोड बस स्थानक परिसर स्मारक चौक तहसील कचेरी रोड हातोडा रोड प्रमुख बाजारपेठेत सर्वत्र दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे

संचारबंदी 3 मे पावेतो

Image
कोविड-19 नियंत्रणासाठी संचारबंदी कालावधीत 3 मेपर्यंत वाढ नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये-डॉ.राजेंद्र भारूड प्रतिनिधी तळोदा - कोविड-19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 च्या कलम 144 नुसार जिल्ह्यात 3 मे 2020 मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश दिले आहेत. तसेच यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश या कालावधीत लागू राहतील. जिल्ह्याच्या सर्व सीमा 3 मे पर्यंत येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात येतील. कोणत्याही खाजगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेशी संबंधीत वाहनांना फिरण्यास अनुमती असेल. जिल्ह्यातील नागरीकांनी केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्यास अनुमती असेल. पोलिसांनी विचारणा केल्यावर योग्य कारण सांगावे लागेल व त्याचा पुरावा सोबत ठेवावा लागेल. अन्यथा कारवाई करण्यात येईल. अशा योग्य कारणांसाठी बाहेर पडल्यानंतरही नागरिकांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्य...

अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्ह्या बाहेर प्रतिबंध

अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यास प्रतिबंध प्रतिनिधी तळोदा -  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्याने विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर जावू नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज किंवा अनुषंगिक कामासाठी जिल्ह्याबाहेर जावू नये. अपवादात्मक परिस्थिती किंवा तातडीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक राहील. जिल्ह्याबाहेर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आहे त्याच ठिकाणी थांबावे व जिल्ह्यात येऊ नये. चेक पोस्टवरील नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ शासकीय ओळखपत्राच्या आधारे ये-जा करू देऊ नये. असे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सभार जी,म,का,

तळोदा डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त घरपोच अन्नदान

Image
सुनील सुर्यवंशी प्रतिनिधी तळोदा आंबेडकर जयंतीच्या खर्चातून गरजू कुटूंबांना जीवनाशयक वस्तूंचे वाटप तळोदा येथिल आंबेडकरी अनुयायांचा निर्णय  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथिल आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी समाजातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सुमारे ११० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आले.           तळोदा येथिल नोकरदार असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकडून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या उत्साहात साजरा केली जाते.जयंतीनिमित्ताने  व्याख्यान,परिसंवाद,भीमगीतगायन,कीर्तन, जलसा यांसारखे प्रबोधनाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील अशा स्वरूपातील कार्यक्रम आयोजित करण्याबाबत तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांचे नियोजन प्राथमिक पातळीवर सुरू होते.मात्र परंतु कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव व त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपा...
Image
  *सामाजिक बांधिलकी*        प्रतिनिधी तळोदा               नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जमातीचे जवळपास *तीस* पुरूष व महिला कामगार वाळूज एम्.आय.डी.सी.परीसरातील कंपनी मधे, रोजगारासाठी आलेले असताना *लॉकडाऊनमुळे* अडकून पडल्याने आणी सध्या कुठलाही रोजगार नसल्याने त्यांची *उपासमार* होत आहे, असे *डॉ.शशीकांत वाणी,तळोदा, यांचेकडून समजल्यानंतर  , बजाज नगर, वाळूज एमआयडीसी, येथील रहिवासी  *श्री.राजेंद्र सोनजे,प्रितेश सोनजे, मनिष सोनजे,आणी पतंजलीचे वितरक श्री शुभम मोडके* यांनी तातडीने सदर ईसमांशी संपर्क करुन व त्यांची भेट घेऊन त्यांना धान्य व इतर खाद्य पदार्थांचे वाटप केले. गहू- ६० किलो तांदूळ- १२ किलो हरबरा- १२ किलो तुरदाळ- ०६ किलो गोडेतेल- १२ बॅग (लीटर) मिरची पावडर-२.५ किलो गरम मसाला-१.५ किलो *पतंजली उत्पादन* मिल्क बिस्कीट - १४४ पुडे आटा नुडल्स - ९६ पुडे दंतकांती पेस्ट - २४ नग मीठ बॅग- १४ नग

शिक्षकांचे ऑनलाईन मार्गदर्शन

Image
सुनील सुर्यवंशी तळोदा प्रतिनिधी  महाराष्ट्रात लाॅक डाऊन असल्याने शाळा महाविद्यालयांना सूटी आहे याचा सदुपयोग करत नंदूरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाने संघटनेचे राज्य पदाधिकारींशी संपर्क करून जिल्ह्य़ातील मूख्याध्यापक संघाच्या पदाधिकारींसाठी दररोज दोन तास आॅन लाईन कार्यशाळा सुरू केली आहे.                                   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लाॅक डाऊन जाहीर केले आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक घरी आहेत. वेळेचा सदुपयोग करीत नंदूरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी संघटनेचे राज्य पदाधिकारींशी संपर्क करून जिल्ह्य़ातील मूख्याध्यापक संघाच्या पदाधिकारींसाठी दररोज दोन तास आॅन लाईन कार्यशाळा सुरू केली आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, व शंका समाधान केले जात आहे.                            ...