Posts

Showing posts with the label शासकीय
Image
पाच मतदान केंद्रावर एक दिवस अगोदरच पोहोचले कर्मचारी तळोदा: अक्कलकुवा मतदारसंघातील अतिदुर्गम भागात नर्मदा नदीच्या काठापलीकडे वसलेल्या पाच मतदान केंद्रावर पाच मतदान पथके सोमवारी रवाना करण्यात आली. बार्जच्या सहाय्याने ही मतदान पथके मतदान बुथवर संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारात पोहोचली.       या मतदान केंद्रामध्ये मनीबेली,चीमलखेडी, बामणी, डनेल,मुखडी या पाच केंद्रांच्या समावेश आहे. या केंद्रांसाठी सोमवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास अक्कलकुवा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून रवाना झाली प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातून या पथकांच्या पाच गाड्यांना हिरव्या झेंड्या दाखवून रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रात चार कर्मचारी समाविष्ट असून त्यांच्यासोबत पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास ही वाहने नर्मदा काठावर वसलेल्या मनीबेली गावापर्यंत जीपने पोहचली. तेथून पुढील प्रवास त्यांनी बार्जच्या सहाय्याने केला.         या पाचही पथकांसोबत मतदान बॅलेट युनिट,कंट्रोल युनिट,व्हीव्हीपॅड, आवश्यक मतदान स्टेशनरी,प्राथमिक आरोग्य कीट, अस...

18 हजार बालके व मातांना मिळणार घरपोच सकस आहार

तळोदा :( सुधाकर मराठे) आदिवासी क्षेत्रातील गरोदर माता आणि बालकांना अंगणवाडी स्तरावर चौरस आहार पुरविला जातो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने अंगणवाडी तसेच आरोग्य केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी देण्यात येणारा चौरस आहार संबंधिताना घरपोच देण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. दरम्यान यामुळे तळोदा 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील 15014 गरोदर  1595, स्तनदा 1437 अश्या एकूण 18046 मातां व बालकांना घरपोच सकस आहार उपलब्ध होणार आहे.           अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर मातांना एकवेळ चौरस आहार देण्याची योजना आहे. ‘भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ या माध्यमातून गरोदर माता आणि सात महिने ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना अंडी, केळी आणि फळे दिली जातात. सध्या राज्यात कोरोना विषाणूची साथ मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारने दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना एकत्रित बसवून गरम आहार दिला जात होता. तथापि, आता कोरोनामुळे गर्दी करणे उचित नसल्याने आणि त्यावर निर्बंधह...