Posts

Showing posts with the label शेतीवार्ता

सातबारा उतारा शिवाय शेतकरी पीक कर्जापासून वंचित

जवळपास महिनाभरापासून सेतू केंद्रावरील सात-बारा लिंक काम करत नसल्याने शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी लागणारा अत्यावश्‍यक सातबारा मिळविण्यास अडचण येत आहे , तसेच लॉक डाऊन मुळे तलाठी कडूनही सातबारा मिळविणे कठीण झाले आहे, या सर्व कारणांनी शेतकरी चांगलाच कोंडीत सापडला असून सातबारा शिवाय आता बँकांकडून पिक कर्ज मिळवायचे कसे? या चिंतेने शेतकरी राजाला ग्रासले आहे              नियमित कर्ज परतफेड केल्यानंतर नवीन पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी बँकांमध्ये नवीन अद्यावत सातबारा उतारा व इतर कागदपत्रे जमा करावी लागतात. परंतु जवळपास महिनाभरापासून लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच सेतू केंद्रांवरील सातबारा लिंक काम करत नसल्याने सातबारा उतारे निघत नाहीत. त्याचप्रमाणे लॉकडाउन मुळे तलाठी देखील आपल्या सजेवर उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्गाला सातबारा उतारा साठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे या सर्वांमुळे शेतकरी वर्ग चांगलेच कोंडीत सापडला असून सातबारा शिवाय आता पिक कर्ज मिळवायचे कसे या विचाराने चिंतातुर झालेला आहे.             ...

तळोदा तालुक्यातील शेती केळी व्यापाऱ्यांच्या प्रतीक्षेत

तळोदा:- (सुधाकर मराठे) तालुक्यातील कोरोना आजार मूळ लॉक डाऊन पूर्वी ११००-१२५०  असणाऱ्या केळी चा भाव ३०० च्या भावाने आडमुठे धोरण ठेवून मागितली जात आहे त्यामुळं मोठा आर्थिक फटका तळोदा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी ना  बसत आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फटका शेतमालाला बसत आहे. बाजारपेठा बंद, दळणवळणाची असुविधा, व्यापाऱ्यांचा नकार यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.  हंगाम लवकरच सुरू होणार असून सध्याच्या परिस्थितीतून मार्ग निघण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.                      जिल्ह्यात शहादा, तळोदा अक्कलकुवा तालुक्यासह इतर भागात केळीचे उत्पादन घेतले जाते. हा माल बहुतांश स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्री होतो.  यंदा हंगामाच्या तोंडावर कोरोनाचे संकट उभे ठाकले. सध्याच्या परिस्थितीत तोडगा काढणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. संचारबंदी लागू केल्यामुळे केळी विक्रीही बाजारपेठांमध्ये ठप्प झालेली आहे. व्यापाऱ्यांकडून जोपर्यंत मागणी येत नाही तोवर केळी खरेदी...