Posts

Showing posts from April, 2026

इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील योगिनी परदेशी हिचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

Image
प्रतिनिधी तळोदा :-- इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील योगिनी परदेशी हिचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तळोदा येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिराची विद्यार्थिनी योगिनी सुनील परदेशी हिने इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून तब्बल ६००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३५०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत भाग घेतला. यातून २५ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली.  या अंतिम टप्प्यात आपल्या ज्ञान, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर योगिनीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे सायकल हे बक्षीस जिंकुन शाळेचा तसेच तळोदा शहराचा गौरव वाढविला. योगिनी ही इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत असून तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे. तिला शाळेतील शिक्षक रवींद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री निखिलभाई तुरखीया, संचालिका सौ. सोनाबेन तुरखीया,उपाध्यक्ष श्री दगेसिंग मह...

तळोदा तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभाग सज्ज; बियाण्यांवरील काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त

Image
प्रतिनिधी तळोदा :-- तळोदा तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभाग सज्ज;  बियाण्यांवरील काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खत व बियाणे वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे. खत व बियाण्यांची साठेबाजी, काळाबाजार तसेच निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री रोखण्यासाठी तालुका स्तरावर विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.        ही पथके विक्री केंद्रे, गोदामे आणि साठा ठिकाणांवर अचानक तपासणी करून उपलब्ध साठा, विक्री नोंदी आणि दरांची पडताळणी करणार आहेत. तपासणीदरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करणे, पावती घेणे, सरलबंद पाकीट तपासणे, वजन व किमतीची खात्री करणे तसेच खरेदीचे नमुने व टॅग जपून ठेवणे आवश्य...

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला

Image
प्रतिनिधी तळोदा :-- मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला मुंबई येथे १५ एप्रिल रोजी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी कार्यालयात पदभार स्विकारतांना बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि शिक्षण आरोग्यापासून वंचितता यांसारख्या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविणे, तसेच बालकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगत  बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी काम करण्याची ग्वाही दिली.      यावेळी बाल सुरक्षा आयोगाचे नवनियुक्त सदस्य श्रीम.गितांजली बालाजी बुटी,शुभांगी संजय तांबट, संजय निळकंठराव लाखेपाटील, अतुल आनंदराव देसाई,  प्रवीण संजाबराव भुजाडे,श्रीम. मिलन देवेंद्र जंगम हे उपस्थित होते. यांनी देखिल यावेळी आपल्या सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. आयोगाचे सचिव पंकज देवरे यांनी याप्रसंगी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष ॲड संजय पुराणिक व अन्य सदस्याचे स्वागत केले.         बालकांचे हक्क हे केवळ कायद्यापुरते मर्यादित नसून ते समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक...

संसदरत्न मार्जी खासदार डॉ. हीनाताई गावित यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

Image
प्रतिनिधी:--( किरण पाटील तळोदा) संसदरत्न मार्जी खासदार डॉ. हीनाताई गावित यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशतकीय जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला संसदरत्न माजी खासदार डॉ. हीनाताई गावित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सामाजिक एकात्मतेचा आणि प्रेरणेचा संदेश दिला. या प्रसंगी माळी समाज अध्यक्ष तथा नगरसेवक आनंदा माळी, उपाध्यक्ष किसन माळी, नगरपालिका विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक लक्ष्मण माळी, सामाजिक कार्यकर्ते माणिक माळी, संभाजी माळी, पप्पू कुरेशी यांच्यासह माळी समाजातील मोठ्या संख्येने बांधव व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना डॉ. हीनाताई गावित यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातही महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी दिलेला लढा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.